शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग...!



"FACEBOOK" हे या मागच्या काही वर्षातले व्यसन ....पण आत्ता तो धारावी पासून time square पर्यंत सगळी कडे पसरले ....मी पण त्याची शिकार झालो.... २००९ चालू झाले तेंव्हा मला कोणी सांगितले असते की "फेसबुक भारी आहे" तेंव्हा मी त्याला वेड्यात (सभ्य शब्द !)काढले असते...

त्याकाळी ऑर्कुट जिवंत होते पण मी त्याची शिकार वैगैरे झालो नव्हतो...एकडे Cookeville ला आलो तेंव्हा पासून ऑर्कुट मृत्यू शय्ये वरती होते..आणि थोड्या दिवसात ते वारले ...आणि मग माझ्या फेसबुक वरती एकावेळी असे ४० लोक वगैरे online दिसायला लागली..माझा फेसबुक वेड येथून चालू झाले....जे काही सुचेल ते status मध्ये टाकायचे ,नवीन फोटो काढला ,गाणं ऐकले की टाक फेसबुक वर असे चालू झाले...त्यातूनच भन्नाट अश्या काही status मेसेज चा जन्म झाला...याच प्रत्येक मेसेज ची एक वेगळी कहाणी आहे...

भारत सोडताना २ वेळचे फुल तूपभात जेवण आणि संध्याकाळी पोहे,सांजा अश्या वाईट सवयी लागलेल्या त्याच घेऊन मी एकडे आलो...येथे तर मला कोणी हे सगळं देणे शक्य नव्हते ..स्वतःला जगवण्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून अंडी खायला चालू केली... मग काय सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचे खाणे..यात सगळ्या मध्ये अंड्याने एंट्री मारली....

म्हणूनच मी म्हणतो "माझ्यासठी अंड हेच पूर्णब्रह्म !"..

याच अंड्याची आम्लेट बनवत होतो...पण ते खूप वेळा मला उलटवता न आल्यामुळे त्याची भुर्जी व्हायची ...असच करता करता मी "आम्लेट उडवायला शिकलो!"

एक दिवस दुपारी गौतम-निवेदिताने घरी जेवायला बोलावले आणि त्या "गरम पोळ्या आणि वांग्याचे भरीत खाऊन मला मोक्ष मिळाला.."!


प्रत्येक सणासुदीच्या दिवशी घरची मला खूप आठवण येते ....दिवाळी आली तर इमोशनल अत्त्याचार होतो.सगळं लहानपण आठवते त्यातून मग हा मेसेज आला.

."चकलीच्या भाजणीचा वास ,मातीचा अळीव पेरलेला किल्ला ,कंदीलातून झिरपणारा केशरी प्रकाश,रस्त्यावरचा फटक्याचा धूर ,kingcong छाप सुतळी बॉम्ब "...या गोष्टी online मिळतात का कुठे ...

स्वदेसचे "ये जो देश हे मेरा "२६ जानेवारी ला ऐकत होतो...आणि एकदम मला माझी शाळा आठवली...

"न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान...खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शुभ्र शर्ट....खिश्यावर तिरंगा पुढे चितळे उभा आणि मागे बिडकर ... "सावधान !" ...पाटील सर घुमटावर ध्वजारोहण करत आहेत......जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य-विधाता.".....
हा मेसेज माझ्या अनेक शाळा मित्रांना माझ्या बरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळेत घेऊन गेला...


असे म्हणतात की "पुणे" आह शब्द कशाशी पण जोडला गेला की ते प्रसिद्ध होतो...मी तर पक्का पुणेकर त्यामुळे पुण्यावर लिहिणे हा माझा जन्म सिद्ध हक्क...!

"पुणेकराबरोबर वाद घातल्यास पुढचा जन्म पुण्यात आणि तो पण सदाशिवपेठे मध्ये मिळेल !!!"..या मेसेज बद्दल कोणाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही....
सदाशिव पेठेची कीर्ती इस्कीमो लोकांपर्यंत नक्की पोचली असेल....

MTV चा रोडीज हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम...त्याची सुरवातीची निवड फेरी मी बघत होतो ...तो रघू आणि राजीव शिव्या सोडून काही बोलतच नव्हते.. त..म्हणून मला वाटले...

"रोडीचे ऑडिशन घेण्याच्या आधी रघु आणि राजीव ला सदाशिवपेठेच्या दुकानामध्ये दुपारी १ ते ४ मध्ये पाठवायला पाहिजे म्हणजे त्यांना शिव्या न देता लोकांचा अपमान कसा करायचा ते तरी कळेल..." मला खात्री आहे की असे शिक्षण घेऊन आले तर पुढच्या निवड फेरी मध्ये त्यांना शिव्यांची कुबडी वापरावी लागणार नाही....

मला पुण्याची बेक्कार आठवण येते नेहमी...लोकांच्या मनात स्वप्नसुंदरी वगैरे येत असतील माझ्या स्वप्नात पुण्यातले रस्ते,गल्ल्या ,पण टपऱ्या ,अमृतुल्य येतात...मी २ वर्ष झाली घरी गेलो नाही म्हणून मला गौरी विचारात होती की तू होम सिक वगैरे होत नाही का....तर माझा उत्तर होते...

"आय नेवर गेट होमसिक बट आय म आल्वेज गेट पुनेसिक....."(I never get homesick but I am always get Punesick ")

हे असेच काही माझ्या मनात येईल तसे लहित असतो...अजून खूप काही बाकी आहे...पुढच्या भागात अजून विषय आणि मेसेज लिहीन....ही न संपणारी कथा तुम्हाला नक्की आवडेल...

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

स्वयंपाकाची पहिली इयत्ता पास !!!

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे आई असे साधे उत्तर आहे.त्यामुळे माझा चहा आणि आम्लेट पर्यंतच gas चा संबध आला होता.तसा मी चहाची गाडी टाकू शकतो येवढा तो बरा व्हायचा.मी आणि नन्या (हेय नाव नेहमीच आत्ता पुढे येणार आहे !) चहा आणि अंडाभुर्जी ची गाडी लावणार होतो पुलं देशपांडे उद्यानासमोर पण आता ते राहून गेले बहुतेक आत्ता Times Square ला लावू. असो.

कॉलेजनंतर मी बंगाल मध्ये आणि कर्नाटका मध्ये नोकरी ला गेलो पण तिकडे एवढे सही जेवण असायचे की घरी बनवायचा प्रयत्न केला नाही.(बंगाली मिठाई नाव नका काढू !) त्यामुळे रस्सम आणि रस्गुल्ल्या मध्ये एक वर्ष निघून गेले. आई नेहमी म्हणायची की "स्वयंपाक शिक् म्हणजे कमीत कमी तुझी बायको तरी मला शिव्या घालणार नाही "...पण कधी मनावर घेतले नाही.

जेव्हां एकडे शिकायला याचे ठरवले तेव्हां वाटायचे की आपण एवढे मोठया reactor मध्ये प्रयोग करतो तसे छोट्या कढई मध्ये करयचे .फक्त "low temperature and open to atmosphere reactor".म्हणून फक्त पद्धत माहिती असली की झालं .एका मागून एक गोष्टी टाकत जायच्या आणि Reaction झाली की gas बंद करायचा असा साधा पुस्तकी विचार केला होता.त्यासाठी मग जय्यत तयरी केली काही पुस्तके विकत घेतली ,sites bookmark केल्या.आणि महत्वाचे म्हणजे आई चा स्वयंपाक २ दिवस बघितला.त्यावरून एक ढोबळ आराखडा बांधला की फोडणी घातली की झाला पुढचं बाप्पा बघून घेईल.

जेव्हां मी एकडे आलो तेव्हां काही पण म्हणा मला आत्मविश्वास बेक्कार जास्त होता.दुसऱ्या दिवशीच मी म्हणलं जरा लाईनीप्रमाणे जाऊ म्हणून चहा बनवायला घेतला.नेहमीच्या सवयीने gas मध्यम ठेवला आणि चहा टाकून पाणी उकळायची वाट बघत बसलो . खूप वेळ वाट बघितली खालची coil तर तापली होती पण पाणी उकळायचे नाव नव्हते. शेवटी कंटाळून gas पूर्ण वाढवला.आपण चूक केली आहे हे कळायच्या आत ते चहा मिश्रित पाणी उतू गेले होते.तरी आपली चूक नाही आपली पद्धत बरोबर आहे coil ची चुकी आहे असे म्हणून दुधावर समाधान मानले.ही तर सुरवात होती.
मग माझ्या स्वयंपाकाच्या turns चालू झाली.पहिल्या दिवशी विचार केला की जीरा राईस बनवू (पद्धत डोक्यात पक्की !)

सगळे मसाले आणि चमचे नीट बाजूला काढून ठेवले.(पद्धत !)पहिला तेलाचाच अंदाज चुकला. जीरा आणि कांदा एकदम टाकला.घरच्या फोडणीचा जसा वास येतो तसा आला थोडा.मग काय confidence अजून वाढला .त्यात लगेचच शिजलेला (electric cooker वर ) भात टाकला पण कालवायचे कसे ? हे फक्त पहिले होते...त्यामुळे तो भात चिकटला ..त्यातून gas लहान करणे माहित नव्हते.असे सगळं चालू असताना त्यात चव येण्यासाठी मिरची( फोडणी मध्ये विसरलेली !) आणि मीठ घातले.शेवटी कळले की हे जे काय आहे ते भयानक आहे .त्या रात्री तो भात घशात उतरताना त्या भाताला पण त्रास झाला असेल.

नंतर आठ महिने असे अनेक अपघात होत राहिले.कधी मिरची चा अंदाज चुकला ,कधी फोडणी देताना कांदा जाळला, भाजीत मसाला न पडता मसाल्यात भाजी पडली, अंडा भुर्जी मध्ये अंडे कच्चे राहिले असं सगळं permutation and combination ने सगळ्या चुका करून झाल्या.या दिवसात मी फक्त बटाटा,डाळ आणि जास्तीत जास्त अंड या मध्येच खेळत होतो.confidence तर कधीच काळाच्या उदरात गडप झालं होता....;) .

या आठ महिन्यात स्वयंपाक नाही आला तरी Patience वाढला . असेच करून बटाटा भाजी चा बेस पक्का झाला.आमच्या घरचा नियम आहे की जेवण खाण्याजोगे नसेल तेव्हां पिझ्झा मागवायचा . माझ्या रुममेट्स ना चांगली सहनशक्ती असल्याने मी २ वेळाच पिझ्झा मागवला. आत्ता तर मागचे काही महिने पिझ्झा मागवायची वेळ आली नाही.
जेव्हां मला फोडणी जमायला लागली तेव्हां मी स्वयंपाकाची "पहिली" इयत्ता पास झालो असे वाटायला लागले.ही पहिली पास होण्यासाठी मला अनेकांनी मदत केली,अनेकांनी माझा स्वयंपाक ना चिडता खाल्ला. आत्ता दुसऱ्या इयत्तेसाठी मी तयार झालो आहे.आत्ता कुठे आईच्या चिमूट भर प्रमाणाचे महत्व कळले आहे.

एक प्रसंग आणि भाषा अभिमान....

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

हा प्रसंग मी दुर्गापूर(पं.बंगाल) ला नोकरी करत असताना घडला.रविवारी कामावरती मला कणकण जाणवत होती म्हणून मी कशी तरी गाडी चालवत घरी आलो आणि मेल्यासारखा झोपलो.कशी काय झोपेत कलकत्ता high way वरती गाडी चालवली रमण्या गणपतीला माहित ! जेंव्हा जाग आली तेव्हा सात वाजले होते आणि माझे तापाने बारा ! कसा तरी घरमालकाला विचारून एका डॉक्टर कडे जाऊन त्याची appointment घेतली.रात्री तसाच काही तरी खाऊन झोपलो.

सकाळी ९ वाजता बोलावले होते म्हणून जरा आधीच गेलो .पण तिकडे त्याच्या कडे appointment फक्त नावाला होती.त्याच्या स्वताच्या घरात त्याचा दवाखाना होता.हॉल मध्ये मध्ये गर्दी होती आणि तो dinning room मध्ये बसून पेशंट तपासात होता.मुख्य म्हणजे त्या घरात सगळा सिगरेट चा धूर भरून राहिला होता.(माझी passive smoking ची सवय मला कामा आली..! ).तो डॉक्टर दुर्गापूर स्टील प्लांट चा निवृत्त डॉक्टर होता.पांढरे केस आणि तो सिगरेट चा निखारा एवढीच आठवण आहे मला.तशा धुरात १ तास बसल्या वर माझी पाळी आली.तो पर्यंत मी त्या धुराने संपलो होतो.
डॉक्टर समोर गेलो आणि त्याने मला बंगाली मध्ये विचारले,"काय झालं आहे ?" मला बंगाली कळते म्हणून मी हिंदी मध्ये सांगयला लागलो .त्याने मला थांबवले आणि बंगाली मध्ये परत विचारले "गाव कुठलं ? मी पुण्याचा आहे कळल्या वर तो म्हणाला की "तू बंगाली मध्ये बोलल्या शिवाय मी तुला तपासणार नाही आणि या भागात कोणाला पण तुला तपासू देणार नाही."!

मी हादरलो ! तरी मी आपली हिंदी सोडली नाही .त्याला पटवून द्यायला लागलो की एकडे मी नवीन आहे मला बंगाली अजून बोलता येत नाही .खरं म्हणजे त्यावेळी माझ्या अंगात बोलण्या एवढी पण ताकत नव्हती.तो बोलायला लागला " मग तो राज ठाकरे मराठी भाषे ची सक्ती का करतो आहे?मी बंगाल मध्ये राहतो मी का बंगाली सोडू.?मी रोज "आजतक " वर पाहतो की कसे महाराष्ट्र मध्ये परप्रांतीयांना हल्कून देत आहे.मला पण असे आसाम मधून हल्कून दिले .येवढा मोठा डॉक्टर पण लोकांना भाषा आणि प्रांत महत्वाची !(तिकडे मी असाह्य पणे त्या सिगरेट च्या धुरात बसलो होतो!)आता मी माझ्या मुलाला पुण्यात पाठवीन का ? मला काय भरोसा की ते राज ठाकरे चे लोक त्याला मारणार नाहीत.तू देतो का भरोसा ?"
मला त्या क्षणी त्या आजतक वाल्यांना अलका च्या चौकात नेऊन मारावासे वाटले.पहिल्यांदा मी माझा मराठी चा अभिमान ताब्यात ठेवला आणि त्याला सांगितले की हे media वाले सगळी वाट लावून टाकतात ,माझे खूप बंगाली मित्रमैत्रिणी आहेत पुण्यात ,तुम्ही पण पुण्यात येऊन हॉस्पिटल ला join होऊ शकतात असं बरच काही बोललो......यात जवळ पास अर्धा तास गेला. पण त्याने बंगाली सोडले नाही पण बहुदा कंटाळून त्याने मला औषध दिले.

तो जो अर्धा तास मला माझ्या कंपनी interview पेक्षा अवघड गेला.मी नंतर बरा झालो ती गोष्ट वेगळी ! मला त्या डॉक्टर चे कौतुक वाटले की तो त्याचा भाषेचा अभिमान जपत होता पण त्याच वेळी वाटले की patient समोर असतना त्याने असे वागायला नको होते.कधी वाटले त्याने जे भोगले तसा तो वागला का media च बोलत होता त्याच्या तोंडून...
भाषेचा अभिमान मला पण आहे पण कुठे दाखवला पाहिजे याची जाणीव या प्रसंगानंतर झाली आहे ...