शेवटी मागच्या आठवड्या मध्ये मास्टर्स चा डिफेन्स झाला आणि आयुष्य परत ब्लोग्गिंग च्या रुळावर आले...थोड्या पार्ट्या आणि नंतर चा आराम (त्याला इंग्लिश मध्ये hangover म्हणतात !) झाल्या वर आज लिहायला बसलो...(तसा मागचा महिना thesis लिहून लिहून डोक्याची मंडई झाली होती !)
दीड महिन्यापूर्वी कुक्वील च्या जवळच्या एका सरोवारची रात्र सहल झाली होती....आमच्या मधले सगळे फोटोग्राफर वीर त्या center hill lake ला हजर होते...गौतम च्या नवीन कॅमेराचे उद्घाटन पण करायचे होते... तसा हा center hill lake एका धरणामुळे तयार झाला आहे...त्याचे ६५ मैल नुसते पाणी म्हणजे वेड लागायची पाळी...!
संध्याकळी पोचलो तिकडे... "संधी प्रकाश" काय मस्त नाव आहे ना ..फोटो काढण्यासाठी निसर्गाने दिलेली अप्रतिम "संधी"...!
माझे न्यूयॉर्क-कालीफोर्नियाचे मित्र त्यांच्या इकडच्या Hummer-Ferrari च्या गोष्टी मला सांगतात...पण हा फोर्ड चा जुना ट्रक मला जास्त भावतो... असे ट्रक आणि ते चालवणारे कंट्री आजोबा यांचे एक गुढ नाते असते ते नव्या गाड्यामध्ये मला कधी दिसले नाही..
अंतरंगात घेऊन जाणारा आणि खोलीचा अंदाज न देणारा हा पूल...एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या मनासारखा...!
हा माझा मित्र गुगल उर्फ श्रीसागर ...फोटोग्राफी चा माझ्या सारखा वेडा...आमच्या वेड्यांचे स्वतःचे फोटो कोणीच काढत नाही..
आणि कोणाला हौस पण नसते...पण कधीतरी फेसबुक च्या भुकेसाठी आम्ही असे एखाददुसरे स्वतःचे अजरामर फोटो काढतो... ;)
रात्र झाली आणि मग आमचे चालू झाले फोटोग्राफीचे प्रयोग (तिकडे पण संशोधन तिच्या मायला !) कॅमेरा tripod वर लावला...गुगल चा SLR असल्याने अमर्यादित शटर स्पीड मिळाला... Motorola Attrix mobile फोनचा उपयोग torch सारखा केला आणि विविध आकार तयार केले....खूप कष्टामधून एक पद्धत सापडली आणि मग फुल धमाल !
हा मीच आहे...इंजिनियर फक्त डोक्याने विचार न करता मनाने पण विचार करतात...आणि जेंव्हा करतात तेंव्हा त्याचा परिणाम खालचा फोटो असतो...
हा गौतम माझा प्रोफेसर मित्र....Mathematics Modeling मध्ये खेळणारा ...त्याला आम्ही आमच्या केमिकल संयुगामध्ये कैद केले....
गणपती कुमार ...खूप विचारी आणि अवकाश संशोधन हा त्याच्या छंद !
The Batman ..गुगल उर्फ श्रीसागर ....कुठली पण गोष्ट विचारा आणि कधी पण विचारा २ सेकंदामध्ये उत्तर मिळते अशी त्याची ख्याती...
मी, श्रीराम आणि गुगल...आमच्या युनिवर्सिटी वर जीवापाड प्रेम करणारी लोक....Tennessee Tech University ला (TTU) ला शेवटी आम्ही आमच्या डोक्यावर बसवले...
(हे शेवटचे long exposure चे फोटो श्रीसागर,गणपती,मी,गौतम,श्रीराम आणि पद्मनाभनकुमार यांनी मिळून काढले आहेत .)
श्री व सौ चौ हे खरं तर आम्हाला पडलेलं टोपणनाव आहे. लग्नानंतर आपला दोघांचा मिळून एक ब्लॉग सुरु करायचा अशी कल्पना एकदा आमच्या डोक्यात आली. यापुढे आपले स्वतंत्र ब्लॉग- आवडते ते सर्वकाही (ओजस चौधरी), सहज कधीतरी (सायली चौधरी)- येथे एकत्र आणत नवीन काहीतरी सुरु करत आहोत.
रविवार, २८ ऑगस्ट, २०११
शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११
आधी बदल आपल्यात.. नंतर आंदोलने..
देशभर उसळलेले अण्णांचे आंदोलन, कार्यकर्त्यांची उपोषणं या आत्ताच्या उफाळलेल्या विषयांवर परवा दुपारी ऑफिसमधे चर्चा चालू होती. बालगंधर्व चौकात ऑफिसनंतर कोण कधी जाणार यावर सगळे बोलत होते. बोलता बोलता प्रत्येकाचे या धर्तीवरचे विचार समोर येत होते. पण त्यात शर्वरी एका विषयावर घवघवून बोलली. आपल्याप्रमाणे अजून कोणीतरी हा विचार करतं ऐकून मला मनोमन बरे वाटले. आधी कधीच या विषयावर लिहिले नाही पण आज गरज आहे कोणीतरी हे बोलायची, किंवा प्रत्यक्षात अमलात आणण्याची.
एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आज जनता सरकार विरोधात उभी ठाकली आहे. आजचा लढा भ्रष्टाचार विरुद्ध असला तरी त्यात आपण सामील व्हायला कितपत योग्य ठरतो हा देखील विचार करणे गरजेचे ठरते. दुसऱ्यावर बोट दाखवणे सोपे असते असं सगळेच म्हणतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज एक लढाई लढली जात आहे. एक चांगला मोठा बदल घडवून आणण्याआधी दिवसातल्या ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी डावचून आपण पुढे जातो प्रथम त्यात सुधारणा आणणे आपले कर्तव्य आहे. सरकारच्या भ्रष्ट वागणुकीच्या विरोधात जाण्यापूर्वी त्याच सरकारने आपल्यासाठी जे नियम केले आहेत ते आपण कितपत पाळतो याची दखल जरी प्रत्येकाने घेतली तरी खूप आहे.
कित्येक साध्या साध्या गोष्टी. सिग्नल हिरवा झाला की पुढे जावे आणि लाल झाला की थांबावे हे इयत्ता पहिलीत शिकवून पण इतक्या वर्षानंतर गाडी पुढे कधी काढली जाते काळत नाही. पादचारी सिग्नल लाल असतानादेखील भरधाव येणाऱ्या गाड्यांसमोर रस्ता पार करणे आणि वर त्यांच्यावर ओरडण्यात काय अर्थ आहे. दुभाजकाचा उपयोग ट्राफिक जास्त असताना त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी सगळ्यांच्या पुढे काढण्यासाठी असतो की काय? त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्यामुळे पुढे जाता येणार नाही आणि सगळाच ट्राफिकचा खोळंबा होईल हे स्वतःहून कधी उमगणार?
सणवारांना, नेत्यांच्या जयंत्याना मोठमोठे स्पीकर लावून बेधुंद नाचून, मिरवणुकीतून ट्राफिक अडकवून, आवाजाचे प्रदूषण करण्यात काय मजा आहे? गरज नाही तिथे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून, अतिवेगाने गाड्या हाकण्यातली मस्ती त्यांच्या नाही पण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हा समंजसपणा कधी येणार. आजकाल जो नियम पाळत गाडी चालवतो तोच ठोकला जातो असे माझे स्पष्ट मत आहे. दिमाखदार गाड्यातून फिरणाऱ्या लोकांना खिडकीतून बाहेर कचरा टाकणे, सिगरेट फेकणे यात काय मोठेपणा गाजवायचा असतो? वर शांतपणे कधी ह्यांना सांगायला गेला तर फुकटचे उपदेश केल्या सारखं दुर्लक्ष केलं जातं. चुकून सिगरेटची एखादी राखेचा कण मागच्याच्या नाकाडोळ्यात गेला तर चेकने नुकसान हे लोक भरणार का..!!
गाड्यांना सामान, पर्स ठेवण्यासाठी शिस्तीत जागा दिली असताना त्या खांद्यावर लटकवून भर ट्राफिकमधे चोरांना आमंत्रणे आपण बायकांनीच द्यायची आणि नंतर ती पळवून नेली की आरडाओरडा देखील आपणच करायचा.. बस, रेल्वे मधे खिडकीबाहेर कचरा टाकू नका सांगितला तर दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकणारे लोक पण कित्येक बघितले. गाडीत खाली ठेवला तर काय बिघडला. गाडी रोज तरी स्वच्छ होते, बाहेरचा निसर्ग स्वच्छ करणारे कोणी पाहिलेत का. पेट्रोल ऑईल घेताना ५०-५० पैशाने पण नफा कमवणारे कामगार तो पैसा आपल्या खिशात घालतात आणि आपण बिल न घेता तो सरकारच्या म्हणजेच आपल्याच tax मधून आलेल्या शेवटीच आपलाच पैसा सहज त्यांच्या हवाली करतो.
मोठमोठ्या जाहिरातींचे, नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावायला सिग्नलच्या समोरची जागा मिळावी की सिग्नलच दिसू नये? निरनिराळे चौकात पुतळे बांधण्यापेक्षा त्याच पैशांचा अजून चांगल्या अर्थाने वापर होऊ शकतो. रात्री जाहिरातींवरचा झगमगाट थोडा कमी झाला, आपल्या घरातले साधे वाशिंग मशीन एक दिवसाआड लावले तरी कित्ये किलोवॅट वीज वाचेल. दुकानात प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे तरी जास्तीचे ५ रुपये भरून ती घ्यायला लोक तयार असतात. प्रथम आपण आपली न्यायला काय वजन पडतं आणि आपण जास्त पैसे भरतोय तर मग ती recycle करता यावी हा अट्टाहास का नसावा? एक-दोन रुपयांच्या सुट्ट्या नाण्यासाठी भांडण्यात काय अर्थ आहे. कॉम्पुटरवर काम झालं की स्क्रीन बंद केला तर काही बिघडत नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊन मोठ्यांना या गोष्टी सांगितल्या तर त्या चांगल्या आहेत तरी पटत का नाही याचे नवल वाटते. मागच्या आणि आत्ताच्या पिढीच्या चुकांमुळे आपली पुढची पिढी त्रासात जगणारे जाची जाणीव सगळ्यांना कधी होणार?
अशा कित्येक साध्यासुध्या गोष्टी आहेत. आपण त्या बदलायच्या की नाही हा विचार स्वतःपासून सुरु करू शकतो. "Its a common human tendency to follow the least resistance." असे एकदा आमचे प्रोफेसर humanity च्या लेक्चरला बोलून गेले होते. पण एक मोठा बदल धडवून आणण्याच्या आंदोलनाआधी तो बदल स्वतःत घडवून आणण्याचा निर्णय प्रथम घेतला गेला पाहिजे. मग नंतर येतात सामाजिक लढे. शेवटी नेते पण आपल्यातलेच एक निवडून आले आहेत. तेव्हा मित्रहो आज सरकार विरुद्ध जाताना एकदा रात्री झोपण्याआधी ५ मिनिटे तरी याचा देखील जरूर विचार करून बघा.....!!
एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आज जनता सरकार विरोधात उभी ठाकली आहे. आजचा लढा भ्रष्टाचार विरुद्ध असला तरी त्यात आपण सामील व्हायला कितपत योग्य ठरतो हा देखील विचार करणे गरजेचे ठरते. दुसऱ्यावर बोट दाखवणे सोपे असते असं सगळेच म्हणतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज एक लढाई लढली जात आहे. एक चांगला मोठा बदल घडवून आणण्याआधी दिवसातल्या ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी डावचून आपण पुढे जातो प्रथम त्यात सुधारणा आणणे आपले कर्तव्य आहे. सरकारच्या भ्रष्ट वागणुकीच्या विरोधात जाण्यापूर्वी त्याच सरकारने आपल्यासाठी जे नियम केले आहेत ते आपण कितपत पाळतो याची दखल जरी प्रत्येकाने घेतली तरी खूप आहे.
कित्येक साध्या साध्या गोष्टी. सिग्नल हिरवा झाला की पुढे जावे आणि लाल झाला की थांबावे हे इयत्ता पहिलीत शिकवून पण इतक्या वर्षानंतर गाडी पुढे कधी काढली जाते काळत नाही. पादचारी सिग्नल लाल असतानादेखील भरधाव येणाऱ्या गाड्यांसमोर रस्ता पार करणे आणि वर त्यांच्यावर ओरडण्यात काय अर्थ आहे. दुभाजकाचा उपयोग ट्राफिक जास्त असताना त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी सगळ्यांच्या पुढे काढण्यासाठी असतो की काय? त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्यामुळे पुढे जाता येणार नाही आणि सगळाच ट्राफिकचा खोळंबा होईल हे स्वतःहून कधी उमगणार?
सणवारांना, नेत्यांच्या जयंत्याना मोठमोठे स्पीकर लावून बेधुंद नाचून, मिरवणुकीतून ट्राफिक अडकवून, आवाजाचे प्रदूषण करण्यात काय मजा आहे? गरज नाही तिथे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून, अतिवेगाने गाड्या हाकण्यातली मस्ती त्यांच्या नाही पण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हा समंजसपणा कधी येणार. आजकाल जो नियम पाळत गाडी चालवतो तोच ठोकला जातो असे माझे स्पष्ट मत आहे. दिमाखदार गाड्यातून फिरणाऱ्या लोकांना खिडकीतून बाहेर कचरा टाकणे, सिगरेट फेकणे यात काय मोठेपणा गाजवायचा असतो? वर शांतपणे कधी ह्यांना सांगायला गेला तर फुकटचे उपदेश केल्या सारखं दुर्लक्ष केलं जातं. चुकून सिगरेटची एखादी राखेचा कण मागच्याच्या नाकाडोळ्यात गेला तर चेकने नुकसान हे लोक भरणार का..!!
गाड्यांना सामान, पर्स ठेवण्यासाठी शिस्तीत जागा दिली असताना त्या खांद्यावर लटकवून भर ट्राफिकमधे चोरांना आमंत्रणे आपण बायकांनीच द्यायची आणि नंतर ती पळवून नेली की आरडाओरडा देखील आपणच करायचा.. बस, रेल्वे मधे खिडकीबाहेर कचरा टाकू नका सांगितला तर दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकणारे लोक पण कित्येक बघितले. गाडीत खाली ठेवला तर काय बिघडला. गाडी रोज तरी स्वच्छ होते, बाहेरचा निसर्ग स्वच्छ करणारे कोणी पाहिलेत का. पेट्रोल ऑईल घेताना ५०-५० पैशाने पण नफा कमवणारे कामगार तो पैसा आपल्या खिशात घालतात आणि आपण बिल न घेता तो सरकारच्या म्हणजेच आपल्याच tax मधून आलेल्या शेवटीच आपलाच पैसा सहज त्यांच्या हवाली करतो.
मोठमोठ्या जाहिरातींचे, नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावायला सिग्नलच्या समोरची जागा मिळावी की सिग्नलच दिसू नये? निरनिराळे चौकात पुतळे बांधण्यापेक्षा त्याच पैशांचा अजून चांगल्या अर्थाने वापर होऊ शकतो. रात्री जाहिरातींवरचा झगमगाट थोडा कमी झाला, आपल्या घरातले साधे वाशिंग मशीन एक दिवसाआड लावले तरी कित्ये किलोवॅट वीज वाचेल. दुकानात प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे तरी जास्तीचे ५ रुपये भरून ती घ्यायला लोक तयार असतात. प्रथम आपण आपली न्यायला काय वजन पडतं आणि आपण जास्त पैसे भरतोय तर मग ती recycle करता यावी हा अट्टाहास का नसावा? एक-दोन रुपयांच्या सुट्ट्या नाण्यासाठी भांडण्यात काय अर्थ आहे. कॉम्पुटरवर काम झालं की स्क्रीन बंद केला तर काही बिघडत नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊन मोठ्यांना या गोष्टी सांगितल्या तर त्या चांगल्या आहेत तरी पटत का नाही याचे नवल वाटते. मागच्या आणि आत्ताच्या पिढीच्या चुकांमुळे आपली पुढची पिढी त्रासात जगणारे जाची जाणीव सगळ्यांना कधी होणार?
अशा कित्येक साध्यासुध्या गोष्टी आहेत. आपण त्या बदलायच्या की नाही हा विचार स्वतःपासून सुरु करू शकतो. "Its a common human tendency to follow the least resistance." असे एकदा आमचे प्रोफेसर humanity च्या लेक्चरला बोलून गेले होते. पण एक मोठा बदल धडवून आणण्याच्या आंदोलनाआधी तो बदल स्वतःत घडवून आणण्याचा निर्णय प्रथम घेतला गेला पाहिजे. मग नंतर येतात सामाजिक लढे. शेवटी नेते पण आपल्यातलेच एक निवडून आले आहेत. तेव्हा मित्रहो आज सरकार विरुद्ध जाताना एकदा रात्री झोपण्याआधी ५ मिनिटे तरी याचा देखील जरूर विचार करून बघा.....!!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०११
Cokestudio.pk
कोकस्टुडीओ खरं तर पाकिस्तानी सिरीज आहे. क्लासिकल पासून कंटेंपररी पर्यंत नवोदित व रुजलेल्या कलाकारांना घेऊन रेकॉर्ड केलेले लाइव्ह फ्युजन सेशन्स. सुरवातीला टीव्ही आणि रेडियोवर प्रसारण व्हायचे. हळू हळू लोकप्रियता वाढली तसे वेबसाईट http://www.cokestudio.com.pk/ , फेसबुक, युट्युबवर जगभर सर्वांना बघण्यास उपलब्ध झाले. वेबसाईट वर सगळ्या एपिसोड्सचे ऑडिओ, विडीओ आणि behind the scenes(BTS) बघायला मिळतात. BTS बघितल्याने त्या गाण्यावर काय नाविन्य आणि मेहनत घेतली आहे अशा प्रत्येक detail कडे लक्ष जायचे. 2008 पासून सुरु झालेला हा प्रोग्राम दिवसेंदिवस अधिकाधिक श्रोते खेचतो आहे. लाल, काळा, पांढरा अशा bright रंगातला सेट पहिल्या झटक्यात लक्ष वेधून घेतो. band मधले सगळे artist उत्तमोत्तम वाजवण्याचा प्रयत्न करतात. आत्तापर्यंत कोकस्टुडीओ (पाकिस्तान)चे चार सिझन्सचे शुटींग झाले आहे. पहिले तीनही एपिसोड्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. चौथा आत्ताच आल्याने हळू हळू येईल.
पाकिस्तानी संगीत आपल्या अरेबिअन, अफगाणी पासून राजस्थानी हद्दीजावालच्या संस्कृतीची छाप मनावर सोडून जाते. झेब आणि हानीया या दोन मुली कमाल करतात. हिंदी पेक्षा त्यांची अफगाणी व अरेबिअन गाणी 'बीबी सनम जानम, अनार सिस्तानम् (My love, you are like the sweet pomegranate of Sistan) http://www.youtube.com/watch?v=kksSpCqM1No&feature=related, पैमोना बिदे की खुमार अस्तान (Bring me the glass so I may lose myself)' http://www.youtube.com/watch?v=QTzHJH1iv30पहिल्यांदा भाषा कळली नाही तरी परत परत ऐकावीशी वाटतात. नझार आईले नझार आईले, गिल यानामा पाझार आईले (Look at me… Look at me… Gather around and we will make it a lively bazaar ) http://www.youtube.com/watch?v=yvLv2-A0mnc गिटारने केलेली सुरवात आणि इतर गाण्यांहून पूर्ण वेगळे असे '5 beats' चे तुर्की गाणे, instruments वर समजायला अवघड पण तेवढेच कायम गुणगुणावेसे वाटते. त्यांचे जावेद बाशीर बरोबरचे पूर्णतः क्लासिकल 'चल दिये' http://www.youtube.com/watch?v=Zz78R2rCOvE&feature=related गाण्याचे बोल आणि मांडणी प्रेमात पडलेल्याला परत प्रेमात पाडेल.
फ्युजन चा कळस म्हणजे नुरी ब्रदर्स. सतार आणि रॉकचे अफलातून जादू ऐकायला मिळते 'किदार' http://www.youtube.com/watch?v=HYlFzD5MCrI आणि 'सारी रात' http://www.youtube.com/watch?v=-S5U2GXKBSo गाण्यात..! दोन्हीमध्ये गम्बी याने जीव खाऊन ड्रमसेट बेक्कार बडवला आहे. आणि याच्या उलट एकदम शांत स्वरूपाचे 'होर वी निवान हो' http://www.youtube.com/watch?v=qUcaCYx0kzI&feature=related गाणं हे भाऊ आई वडिलांबरोबर सादर करतात ते पण तेवढंच उच्च..
राहत फतेह अली खान क्लासिकल 'गरज बरस' http://www.youtube.com/watch?v=2iTDaBXsLhM&feature=related चालू करतो आणि अली अझमत पुढे भाव खाऊन जातो. strings आपली नेहमीची गाणी सादर करून शांत बसले आहेत पण त्यात देखील 'सरकिये, तीतलीया, झिंदा' मस्त जमली आहेत. अबिदा परवीनचे 'रमुझ-ए-इश्क़ (में हू माशहूर)' ऐकल्यावर एका वेगळ्याच विश्वात पोचल्यासारखे वाटते. सारेगामापा विनर अमानत अली इंग्लिश मधले 'आयेशा' http://www.youtube.com/watch?v=iJJYdY-9U-w&feature=related हिंदीत सुरेख सादर करतो. त्याच्या घोगऱ्या आवाजातले 'ए वतन के सजीले जवानो' http://www.youtube.com/watch?v=VXQzzJZXcYc सरळ काळजात घुसते. आतिफ अस्लमचे 'जल परी http://www.youtube.com/watch?v=zmLp3PC71vE&feature=related आणि किनारा' http://www.youtube.com/watch?v=TXGTA3X99g0 आत्तापर्यंत त्याचे best performance असतील.
या सगळ्यात मनाला भिडणारा आवाज म्हणजे शिफाकत अमानत अलीचा. 'आखोके सागर' http://www.youtube.com/watch?v=I7xqX51zqoM&feature=related आणि 'खमाज' http://www.youtube.com/watch?v=uMF8npZN5wE&feature=related ऐकताना आपोआप डोळे बंद होतात. ओरीजीनल ऐकावेसे वाटत नाही इतका सुरेख मेकओव्हर एखाद्या गाण्याचा पहिल्यांदाच ऐकायला मिळाला.
'नैना दे आंखे लग गये, रोना छोड दिया, इक आलीफ, कुछ अजब खेल, जो मेरे, चूप' अशी अजून कित्येक गाणी कोकस्टुडीओ गाजवतात. ही लोकप्रियता बघून Mtv ने कोकस्टुडीओ भारतात आणले. आपल्या वेगवेगळ्या भाषा, त्यांच्या निरनिराळ्या शैलीतली गाणी आणि यात फुजन तर अजून विविधता आणेल..हळू हळू आपल्या नवनवीन आणि दिग्गज कलाकारांना ऐकायची संधी मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणे कोकस्टुडीओ आपल्या मैफिली अशाच रंगवत राहील हे नक्कीच..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)